पाच वर्षात जिल्हा परीषदेचा कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन
सोलापूर..
जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना पाच वर्षात जिल्हा परिषदेमधील सभा व कामकाज, आदर्श मतदारसंघाचे नियोजन, निधी तरतूद, विकास आराखडा , माझी वसुंधरा व पंचायत समृध्द योजना यासह इतर विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथे सकाळी १०.३० वाजल्यापासूम सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यशाळा पार पडणार आहे.
कार्यशाळेत विविध मान्यवर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.वि.) जिल्हा परिषद सोलापूर श्रीमती स्मिता पाटील, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (उपसंचालक तथा संचालक, यशदा, पुणे), सुरेश पाटील (माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद पुणे), गिरीश पिंपळनेर (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी), आनंद पुरसवळे (उपसंचालक, रा.ग्रा.वि.सं.), तसेच रमेश जाधव (उपसंचालक वित्त व सहायक प्राध्यापक) आदी तज्ञ मान्यवरांकडून जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन होणार आहे. यामुळे पाच वर्षात जिल्हा परिषदेतील कामकाजाविषयी माहीती होणार असून कामकाज सुरळीत चालण्यास मदत होणार आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









