‘ राज्यातील विद्यार्थ्यांची लूट थांबवा’
सोलापूर :
राज्यातील खाजगी ट्युशन्स (कोचिंग क्लासेस) आणि अधिकृत शाळा यांच्यातील वाढत्या वादावर आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला आणि शिक्षणमंत्र्यांना धारेवर धरले. “राज्यात विद्यार्थ्यांची लूट थांबवायची असेल तर सरकारने एक स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे,” असे आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात सांगितले.
विद्यार्थी शाळेत न जाता थेट कोचिंग क्लासेसला प्राधान्य देत असल्याने शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारला उद्देशून आमदार कडू म्हणाले, “एकतर अधिकृत शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर त्या बंद करून खाजगी शिकवण्यांनाच मान्यता द्या; ही दुटप्पी भूमिका थांबली पाहिजे.” अनेक टयुशनचालक पालक व विद्यार्थ्यांकडून भयनसाठ फि वसूल करून लूट करीत आहेत. याबाबत अनेक वेळा शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे खासगी टयुशन घेणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आमदार बच्चू कडू यांनी
खाजगी ट्युशन्स चालकांकडून अवाढव्य फी वसूल केली जात असून, सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील ‘डमी शाळा’ आणि बेकायदेशीर कोचिंग क्लासेसवर तातडीने ट्युशनबंदी किंवा कडक नियमावली लागू करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात यावर स्पष्टीकरण दिले. शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, शाळांना दांडी मारून कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कडक नियमावली आणली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









