Tuesday, July 28, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 23, 2026
in सोलापूर
0
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी 

सोलापूर : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने गुरुवारी सोलापुरात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे ४०० वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत केंद्र व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सिव्हिल चौक, पांगळ हायस्कूल, जिल्हा परिषद पूनम गेट या प्रमुख मार्गावरून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला. मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात मोर्चा पार पडला.


मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वकिलांनी आपली भूमिका मांडली. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि कायद्याचे राज्य या मूल्यांचे संरक्षण करणे ही न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांचे मूलभूत हक्क अबाधित राहावेत आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी विधी मंच सातत्याने लढा देत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
______________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

Next Post

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला 'चरणसेवा'चा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026
वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

July 21, 2026
वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक