उसाला 5,500 रुपयांचा हमीभाव द्या!
दक्षिण सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने तातडीने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 5 हजार 500 रुपये हमीभाव द्यावा, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत ऊस दर निश्चित होत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात किसान सभा सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करता उसाला 5,500 रुपये दर देणे गरजेचे आहे. शासनाने सन 2025 च्या पिक विम्यातून अक्कलकोट तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे, त्यांना तातडीने विम्याची रक्कम अदा करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शेतकरी आणि पशुधनासमोरील गंभीर संकट लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा अखिल भारतीय किसान सभा शेतकरी हितासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी, दत्ता चव्हाण, जावेद आवटे, तात्यासाहेब व्हनमाने, दयानंद फताटे, भिमाशंकर झळके, शांतकुमार कोळी, स्वामीनाथ शिरगुर, नरेंद्र लोभे, सिकंदर मकानदार, स्वप्नील बणजगोळे, शिवानंद पाटील व बशीर शेख यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
…….
*नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.












