Friday, April 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

हत्तूरच्या स्वामी समर्थ परीवारामुळे २६७ ऊसतोड कामगारांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचे लाभ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 12, 2026
in सोलापूर
0
हत्तूरच्या स्वामी समर्थ परीवारामुळे २६७ ऊसतोड कामगारांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचे लाभ
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हत्तूर येथे ऊसतोड कामगार‌नोंदणी, नेत्र तपासणी शिबिर संपन्न

हत्तूर…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात योगदान देणाऱ्या हत्तूर येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने लिं. यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २६७ ऊसतोड कामगारांसाठी मोफत नोंदणी करण्यात आले . त्यामुळे या कामगारांना शासनाकडून विविध योजनांचे लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच २७३ जणांची त्यांची नेत्र तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले‌. हत्तूर येथील राजेंद्र कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थ बँक, पतसंस्था,सहकारी संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला.या शिबिराची सुरुवात समर्थ कुलकर्णी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर परिवाराचे प्रमुख राजेंद्र कुलकर्णी, सरपंच ज्योती कुलकर्णी, प्रा. सिद्राम म्हेत्रे, बम्मनिंगय्या स्वामी, भीमाशंकर कनपवडीयर, सिकंदर नदाफ, ज्योत्यप्पा सिनेवडीयर, बाबुराव नारायणे, बशीर शेख, सिद्धाराम कानडे, बनसिद्ध पटेवडियर, भीमाशंकर छप्पेकर, महादेव कांबळे, गनी शेख, शिवानंद हावडे पाटील, विठ्ठल हतूरे, प्रकाश निबंर्गी, वासु नाईकवाडे, शिवानंद निरवणे, भीमाशंकर कुलकर्णी, महातप्पा सिताफळे, आदी उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, ऊसतोड कामगारांची नोंदणी नसल्याने त्यांना शासनाकडून विविध योजनेचा लाभ मिळत नाही.या भागातील कामगार शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.या नाव नोंदणी मुळे कामगारांना गृहउपयोगी भांडी वस्तू मिळतील, दुदैवाने अपघातात मृत्यु झाल्यास ३५ लाख,कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख तसेच शेतातील बैलांच्या जोडीचा मृत्यु व अपंगत्व एक लाख तसेच झोपडीचे नुकसान झाल्यास दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

Next Post

बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार – सिईओ कुलदीप जंगम

आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार – सिईओ कुलदीप जंगम

April 17, 2026
मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

April 17, 2026
जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे

जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे

April 17, 2026
विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

April 17, 2026
झेडपी सदस्यांना मिळाले कामकाजाचे प्रशिक्षण

झेडपी सदस्यांना मिळाले कामकाजाचे प्रशिक्षण

April 16, 2026
सीईओ कुशल जैन यांनी स्वीकारला पदभार

सीईओ कुशल जैन यांनी स्वीकारला पदभार

April 16, 2026
पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना मिळणार आवश्यक सुविधा … जिल्हाधिकारी

पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना मिळणार आवश्यक सुविधा … जिल्हाधिकारी

April 15, 2026
कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवे सीईओ

कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवे सीईओ

April 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक