सोलापूर
थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय दरम्यान अर्धनग्न मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून गोकूळ साखर कारखान्यांकडील थकीत बिलासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी, अशी मागणी केली. तसे आश्वासन साखर आयुक्त कोलते यांनी दिल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी सह प्रादेशिक साखर कार्यालय येथील आंदोलन मागे घेतले. मात्र, जोपर्यंत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्यांकडील थकीत ऊसबिलासाठी धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी गेल्या अकरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शेतकऱ्यांनी पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय अर्धनग्र मोर्चा काढून सह प्रादेशिक साखर कार्यालय येथे दोन तास ठिय्या मारला.
त्यानंतर पोलीसांनी सह प्रादेशिक साखर आयुक्त कार्यालयातील प्रभारी साखर सहसंचालक आबासाहेब गावडे यांच्याना बोलावून आंदोलकांशी चर्चा करायला लावली. त्यावेळी प्रभारी साखर सहसंचालक गावडे यांनी थेट साखर आयुक्त कोलते यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून शेतकरी आंदोलक नेता ॲड. अमोल पाटील, अरविंद गोडके, माजी पंचायत समिती विरोध पक्षनेता बाळासाहेब मोरे यांच्याशी बोलणे करुन दिले. आयुक्तांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी सह प्रादेशिक साखर कार्यालय येथील आंदोलन मागे घेतले .

—-
चौकट
….
परवाना नसताना कारखाना चालला कसा :
…,
साखर आयुक्त कार्यालयाचा गाळप परवाना नसताना गोकूळ साखर कारखान्यांने तीन लाखांपेक्षा जास्त टन ऊसाचे गाळप कसे केले. सह प्रादेशिक साखर कार्यालयाने वेळीच कारखान्यांवर कारवाई केली असती तर शेतकऱ्यांचे बिले थकले नसते. बिले थकण्यास सह प्रादेशिक साखर कार्यालयच जबाबदार असल्याचा दावा शेतकरी आंदोलन नेते ॲड. अमोल पाटील यांनी केला आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








