Friday, June 5, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 5, 2026
in सोलापूर
0
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नदीपात्रात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वॉच टॉवर उभा करावे

पंढरपूर :- आषाढी वारी 2026 यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखानी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. वारकरी, भाविकांना मागील वर्षीच्या वारीपेक्षा यावर्षीच्या वारीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. वारी कालावधीत कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांनी राजा घेऊ नये, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या राजा मंजूर करू नयेत. त्याप्रमाणेच या कालावधीत कोणीही आपला मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा अशा अधिकारी कर्मचाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विभागीय आयुक्त शितल तेती उगले यांनी दिले. येथील केपीबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी 2026 अनुषंगाने आढावा बैठकीत श्रीमती तेली – उगले मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त शितल तेली उगले पुढे म्हणाल्या की, नदीपत्रात जाणाऱ्या भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वाॅच टाॅवर उभारावेत . आषाढी वारी पालखीतळ, विसावा व मुक्कामाची ठिकाणे, पालखी मार्ग असणार्‍या ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवावे. वारकऱ्यांना पिण्याच्या पाणीचे नियोजन करून कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये दिवसातून तीन ते चार वेळेस स्वच्छ करावे . प्रकाशव्यवस्था, अग्नि प्रतिबंधक व्यवस्था, आरोग्य पथके व्यवस्था योग्य पद्धतीने ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

June 2, 2026
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

June 2, 2026
पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

June 1, 2026
विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

June 1, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक