नदीपात्रात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वॉच टॉवर उभा करावे
पंढरपूर :- आषाढी वारी 2026 यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखानी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. वारकरी, भाविकांना मागील वर्षीच्या वारीपेक्षा यावर्षीच्या वारीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. वारी कालावधीत कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांनी राजा घेऊ नये, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या राजा मंजूर करू नयेत. त्याप्रमाणेच या कालावधीत कोणीही आपला मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा अशा अधिकारी कर्मचाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विभागीय आयुक्त शितल तेती उगले यांनी दिले. येथील केपीबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी 2026 अनुषंगाने आढावा बैठकीत श्रीमती तेली – उगले मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
विभागीय आयुक्त शितल तेली उगले पुढे म्हणाल्या की, नदीपत्रात जाणाऱ्या भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वाॅच टाॅवर उभारावेत . आषाढी वारी पालखीतळ, विसावा व मुक्कामाची ठिकाणे, पालखी मार्ग असणार्या ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवावे. वारकऱ्यांना पिण्याच्या पाणीचे नियोजन करून कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये दिवसातून तीन ते चार वेळेस स्वच्छ करावे . प्रकाशव्यवस्था, अग्नि प्रतिबंधक व्यवस्था, आरोग्य पथके व्यवस्था योग्य पद्धतीने ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








