जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन दिमाखात साजरा
सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या काळात यशस्वीपणे कार्यभार सांभाळण्यासाठी आदर्श यंत्रणा उभारली. शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महापालिकेच्या स्थायी समितीच्या चेअरमन रंजीता चाकोते, महिला व बाल कल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, कृती व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर पंचायत समितीच्या सभापती तेजस्वीही बोराडे, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, नगरसेवक नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, शिक्षणाधिकारी कादर शेख प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करणेत आले. त्यानंतर स्वराज्य गुढीचे पुजन पालकमंत्री गोरे व मान्यवरांचे हस्ते करणेत आले. स्वागत व प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान अध्यक्ष दिपक वैद्य यांनी शिवचरित्र देऊन केला. माध्यमिक शिक्षण विभागाने नेटकेपणाने शिवराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षणधिकारी सचिन जगताप यांनी शिवचरित्र भेट देणेची संकल्पना राबविली. या साठी अधिक्षक अनिल जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, स्थापत्य अभियंता चेतन वाघमारे, समन्वयक अनिल पाटील, कनिष्ठ सहाय्यक रेवणनाथ, मेहताब शेख यांनी परिश्रम घेतले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









