हालाखीच्या परीस्थितीत नोकरी करून परीवारासह जनसेवेला प्राधान्य देणारे शैलेश मुंजे
मंद्रूप :
कर्माची शिदोरी खांद्यावर, कर्तव्याची गाठ बांधली,
तीन दशकं सेवा करून, गावोगावी नाव ठेवले.”
मंद्रूपचे सुपुत्र आणि मुंजे कुटुंबाची “ओळख” असलेले श्री. शैलेश गंगाधर मुंजे उर्फ ‘अण्णा’ हे आज ३३ वर्षांच्या निरंतर शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
“खुर्ची निवृत्त झाली, पण अण्णांची समाजसेवा कधीच निवृत्त होणार नाही.”
मंद्रूप येथील गरीब शेतकरी कुटुंबातील स्व. मळेप्पा मुंजे यांना गंगाधर, मल्लेशी आणि महादेव अशी तीन मुले व काशीबाई आणि चंद्रकला अशा दोन मुली. आजोबांच्या निधनानंतर आजी गौराबाई यांच्या संस्कारातून गंगाधर आणि त्यांच्या भावांना उच्च विचार मिळाले.
घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शावरसिध्द आणि मळसिध्द या दोन भावांनी शिक्षण अर्धवट सोडले. मात्र शैलेश यांना शिक्षणाची गोडी असल्याने वडील गंगाधर , आई काशीबाई आणि दोन्ही काका मल्लेशी व महादेव यांनी एकत्र येऊन त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य केले. अण्णांनी डी.एड आणि कृषी पदविका पूर्ण केली. नोकरी मिळेपर्यंत वळसंग सूतगिरणी येथे शेती सुपरवायझर म्हणून हंगामी काम करून कुटुंबाला आधार दिला.
अखेर ३ जून १९९३ रोजी दक्षिण सोलापूर पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून रूजू झाले. त्यांच्या ग्रामसेवक नोकरीची सुरूवात बरूर गावापासून झाली. मुंजे कुटुंबासाठी नवा “टर्निंग पॉईंट” आला. यानंतर ३३ वर्षात त्यांनी दक्षिण सोलापूरमधील बरूर, नांदणी, बसवनगर, राजूर आणि अक्कलकोटमधील शेगाव, कलकर्जाळ, चिंचोळी(न.) या ७ गावांमध्ये काम केले. सेवेत असताना त्यांनी शासनाच्या नियमांना प्राधान्य दिले. त्यामुळे ३३ वर्षात एकही तक्रार अर्ज किंवा वरिष्ठांची नोटीस नाही. बदली झाल्यानंतरही “अण्णांनीच राहावे” असा आग्रह राजकीय नेते आणि नागरिकांनी धरला होता. त्यामुळेच २००१ साली तालुकास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळाले.
१९९५-९६ मध्ये बरूर येथे ५६ झोपड्यांना आग लागली होती. त्या जळीतग्रस्तांना घरे मिळवून देण्यासाठी लोकप्रथीनीधींच्या सहकार्याने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यात “बरूर पॅटर्न” आदर्श ठरला. हा त्यांच्या सेवेचा अविस्मरणीय ठेवा आहे. नोकरी लागल्यानंतरही अण्णांनी सोलापूरला न जाता मंद्रूपमध्येच राहणे पसंत केले. येथे राहून त्यांनी मुलगा शिक्षक, मुलगी डॉक्टर व मोठ्या मुलीचे पदवीपर्यंत शिक्षण होण्यासाठी सहकार्य केले. तसेच काकांच्या मुला-मुलींनाही शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.
“सकाळी शेतात काम बघून जनसेवेचा प्रारंभ होत असे. त्यामुळे दोन्ही हातांनी समाज घडविण्याचे काम नेहमी झाला आहे .
लहानपणापासून शेतीची आवड असलेल्या अण्णा आजही सकाळी ७ ला शेतात असतात. कलिंगड, पपई, केळी, द्राक्षे, झेंडू, कांदा अशी पिके ते स्वतः लक्ष देऊन आधुनिक शेती करतात.
सेवानिवृत्तीनंतरही ते विविध सामाजिक आणि शासकीय कार्यात सहभागी राहणार आहेत.
“रिकामे खुर्ची, भरलेला इतिहास,
अण्णा, तुमची निष्कलंक सेवा आमचा अभिमान.”
आमच्या मुंजे परीवाराकडून त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा !
—__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













