तहसीलदारांकडून नागरीकांच्या कामाकडे दुर्लक्ष
आमदार देशमुख यांनी दिली तहसीलदारांना सूचना
मंद्रूप …
सरकार शासनाच्या कार्यात पारदर्शक व गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र शासनाचे प्रतिनिधी व नागरीकांचे सेवक असणारे अधिकारी शेतकरी व नागरीकांची कामे करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरीक मेटाकुटीला येऊन अधिकार्यांच्या दलालांकडे जातात. यामुळे अधिकार्यांना अच्छे दिन आले असले तरी तालूक्यात दलालांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधिकार्यांनी दलालांची संख्या कमी नागरीकांची कामे त्वरीत करावे. तसेच शासकीय कार्यालयातील दलालांची संख्या बंद करणार नसाल तर त्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूपचे तहसीलदार व अधिकार्यांना विचारला. आमदार देशमुख यांच्या सुचनेला नागरीकांमधून टाळ्यांच्या कडकडाटातुन प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक ठिकाणी शासकीय कामात दलाली होत असल्याचे सिध्द झाले आहे.
मात्र यावेळी आमदारांनी दलाली बंद न झाल्यास तहसीलदार, बीडीओ, तलाठी, सर्कल , ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा इशारा दिल्याने दक्षिणमधील अधिकार्यांची मनमानीपणा उघडकीस आले आहे.

दक्षिण तालुक्यात वाळू, मुरूम व गौणखनिजाचे अवैद्य उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अधिकारी त्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी दलालामार्फत साटेलोट करतात. त्यामुळे शासनाचे महसूल घटत आहे. म्हणून तहसीलदारानी वाळू व मुरूमची अवैद्य उपसा करणार्या व त्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची सूचना आमदार देशमुख यांनी दिली.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








