जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात
सोलापूर –
जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात करीत सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. या अभियानाचा शुभारंभ नूतन ३३२ शिक्षकांना जागेवर समुपदेशनाने नियुक्ती देऊन सुरुवात केली. सामान्य प्रशासन विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील पांडुरंग ज्ञानेश्वर शिंदे व आदिती चव्हाण या उमेदवारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे हस्ते नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करणेत आला.
यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षण व आरोग्य समितीचं सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती अमृता वाघे, कृषी व पशु संवर्धन विभागाचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ प्रमुख उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन सोलापूर जिल्ह्यात या सेवा संकल्प अभियानाचे विशेष नियोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा कार्याचा या निमित्ताने गौरव होत असल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संकल्प सेवा अभियानाबरोबर २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता महा श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानातील घटकांची चार सप्ताहात प्रभावी अंमलबजावणी करा. असे आवाहन सिईओ कुशल जैन यांनी केले.
ग्रामविकास व पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकास विभागाने दिलेले सुचना चार सप्ताहात विशेष सेवा द्या. सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणीस गती द्या. स्वच्छता ही सेवा २०२६ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन जलसंधारणाची कामे हाती घ्या असे आवाहन सिईओ जैन यांनी केले. शिक्षण विभागातील ३३२ शिक्षकांचे समुपदेशन घेऊन नियुक्ती देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात केला आहे,ही अभिमानास्पद बाब असल्याचे सिईओ जान यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा कार्याचा सन्मान म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने राज्यात चांगली सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाली. माझा विभागाने केलेली सुरुवात मनाला समाधान देणारी आहे. मार्डी व बिबीदारफळ सारख्या गावांचा स्वच्छतेचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्तविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले. शिक्षण विभागाच्या माध्यमातून ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश वितरण करण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाधिकारी विशाल मुळे व त्यांचे टीमने समुपदेशन घेऊन पारदर्शी पध्दतीने ही नियुक्ती देणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकंत भुजबळ यांनी आभार मानले.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!












