द्राक्षे, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिके जमीनदोस्त
सोलापूर….
सोमवारी दुपारी मंद्रूप व भंडारकवठे परीसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व कांदा यांच्यासह द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हवामान विभागाने आठ दिवसापूर्वीच २३ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवार २० फेब्रुवारी पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाले. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांवर संकट कोसळला आहे. तर गहू, ज्वारी व हरभरा पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर अवकाळी पावसामुळे द्राक्षे पिकावर परीणाम झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत दिसून येत आहे. यामुळे गहू व ज्वारी पिकांच्या उत्पादनावर परीणाम झाले आहे.
__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









