Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आदिवासी समाजातील परीवर्तन हीच माझी “एनर्जी”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 6, 2026
in सोलापूर
0
आदिवासी समाजातील परीवर्तन हीच माझी “एनर्जी”
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*आदिवासी बांधवांचा विश्वास जिंकून परिवर्तन घडविले: डॉ. मंदाकिनी आमटे*

सोलापूर,

– भामरागडच्या दुर्गम जंगलात काम सुरू केले तेव्हा रस्ते, वीज, पाणी अशी कोणतीही सुविधा नव्हती. आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती आणि आरोग्यसेवेची कोणतीही साधनेही नव्हती. मात्र सातत्याने सेवा दिल्यामुळे त्यांचा विश्वास जिंकता आला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडू लागले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पदमश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोप आणि ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अनिल घनवट यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या की, १९७२ साली विवाहानंतर पती डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. त्या काळी तेथील परिस्थिती अत्यंत कठीण होती. रस्ते, पूल, वीज, पाणी तसेच संवादाची साधने नव्हती. सुरुवातीला आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती. मात्र त्यांची भाषा शिकून आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली. अंधश्रद्धेमुळे अनेक जण मांत्रिकांकडे जात असत; परंतु सातत्याने उपचार करून विविध आजार बरे झाल्यानंतर लोकांचा विश्वास बसू लागला. आरोग्यसेवेबरोबरच शेती आणि शिक्षण क्षेत्रातही काम सुरू करण्यात आले. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याची जाणीव झाल्यानंतर मुलांसाठी शाळा सुरू केली. आज त्या शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार दिल्यने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, वडील बाबा आमटे यांनी आनंदवनातून समाजसेवेची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेनेच आम्ही हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. सेवाभावाने सातत्याने काम केल्यास समाजाचा विश्वास संपादन करता येतो. कोणतेही काम लहान समजू नये; मनापासून आणि समर्पित भावनेने केलेल्या कार्यातूनच समाजात परिवर्तन घडते, असे ते म्हणाले.

डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी समाजपरिवर्तनाचा आदर्श घालून दिला. त्याच धर्तीवर डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, लोकाभिमुख समाजसेवा आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रदान केल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. यंदापासून हा पुरस्कार देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून तरुणांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

नामविस्तार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, लोकवादन, ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन, निबंध स्पर्धा, लोककला सादरीकरण तसेच वृक्षारोपण आदी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास उद्योजिका सुवासिनी शहा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते पाटील, एम. डी. कमळे, प्रा. सचिन गायकवाड, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, यतिराज होनमाने, प्रा. जैनुद्दीन मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूरच्या तापमानामध्ये वाढ

Next Post

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक