ऊन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीची बैठक ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर, लाभक्षेत्र विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उजनी धरणात ७.० टीएमसी पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .
मे २०२६ पासून भीमा नदीमार्गे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गठीत करण्यात आलेल्या या समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उजनी धरणामध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणी राखून ठेवण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









