जिल्ह्यातील स्मशानभूमींचा विषय संपविणार … पालकमंत्री
सोलापूर :
जर गावात स्मशानभूमी नसेल तर गावांना विकास कामांसाठी निधी मिळणार नाही. यासाठी आता गावात स्मशानभूमी आहे, असा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या गावातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
कोणत्याही गावात विकासनिधी देण्यापूर्वी त्या गावात स्मशानभूमी असणं आवश्यक केलं आहे. त्यामुळे स्मशानभूमीला प्राधान्य दिल्यानं आता अनेक गावात स्मशानभूमीची कामे होत आहेत, ज्या गावात स्मशानभूमी नाही, त्या गावांना विकासनिधी देणं बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात स्मशानभूमी नाही. अनेक गावात स्मशानभूमी साठी जमीन आहे; मात्र सेवासुविधा नसल्याने त्याचा वापर होत नाही. अनेक गावातील जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा विषय सोलापूर जिल्ह्यात चांगलाच भेडसावत आहेत. जिल्ह्यातील १२० गावात स्मशानभूमीसाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे, मात्र त्या स्मशानभूमीतील सेवासुविधा निर्माण करण्यासाठी निधीची गरज आहे. त्या स्मशानभूमीसाठी निधी दिला जाईल, त्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









