जीवनधारा नागरी पतसंस्थेकडून
१५१ मतदारनोंदणी करून ओळखपत्रांचे वितरण
सोलापूर…
जीवनधारा पतसंस्था व सिद्धारुड मल्टि सर्विसेस यांच्या वतीने हत्टूरमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या १५१ तरुण – तरुणींना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करून त्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यात आली. या नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. लोकशाही पाया मजबूत करण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे .
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहे, याची जाणीव करून देण्यात आली. जीवनधारा नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत भरले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नवमतदारांना स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. जीवनधारा नागरी पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन या कार्यक्रमातून झाले.
यावेळी प्रशांत सलगरे, रावसाहेब व्हनमाने ,सिद्धाराम कानडे ,सोमनाथ कोळी, राजशेखर पाटील , कांताप्पा पावटे, तानाजी अवताडे,सुबान अत्तार,बाबुराव चव्हाण,अमजद नदाफ,गणेश काळे,अर्जुन नाईकवाडे , इरेशा सिनेवाडीयार ,अस्लम शेख,केदार उपासे, संतोष सीताफळे,विजय सावंत, अंबाजी छपेकर, तॊफिक बागवान,श्याम कस्तुरे,सोमनाथ वाघमोडे,सोमनिंग व्हनमाने, प्रमोद कुलकर्णी,विठ्ठल कळसुरे,प्रदीप पाटील, आकाश मामदापुरे,आनंद सिताफळे, बनसिध्द पटेवडीयार, इशान अत्तार ,महेश डोळळे, चनबसप्पा भरले, रवी हवीनाळे,
मलकारी कोरे, बनसिध्द आकळवाडे,सोमनाथ मंगरुळे, बनसिध्द विभुते,आमसिध्द हिरकूर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसिद्ध वडरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महेश आवताडे व मित्रपरिवार यांनी पार पाडले.
….
चौकट
…..
मतदानाद्वारे योग्य प्रतिनिधी निवडणे हीच खरी देशसेवा आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानप्रक्रीया महत्वाची आहे. म्हणून जीवनधारा पतसंस्थेमार्फत १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांचे मतदान नावनोंदणी करून त्यांना ओळखपत्रही देण्यात आले. मतदारांनी मतदान करून गाव व देशाच्या विकासप्रक्रीयेत सहभागी होणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून जीवनधारा पतसंस्थेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले.
श्रीकांत भरले, चेअरमन,
जीवनधारा पतसंस्था
…









