Saturday, March 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणिमधील पाणीटंचाई दूर होणार

आमदार देशमुख यांच्या प्रयत्नामुळे उजनी धरणातून सोडण्यात आले पाणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 20, 2026
in सोलापूर
0
दक्षिणिमधील पाणीटंचाई दूर होणार
0
SHARES
466
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार सुभाष देशमुख यांच्या पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांकडून होकार

सोलापूर.. एक महिन्यांपासून भीमा नदीतील पाणी संपल्यामुळे दक्षिण तालुक्यामधील १५ ते २० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. सादेपूर बंधारा येथे कर्नाटक सरकारकडून पाणी अडविण्यात आल्याने मंद्रूपसह अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तर लवंगी, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर या गावातील नागरीक शेतकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे पिके करपून चालली आहेत. तर पशूंच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करून पाणी सोडण्याची विनंती केल्यावर जलसंपदा मंत्र्यांनी त्वरीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. 

 

उजनी धरण येथून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी दूरध्वनीवरून दिली. या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी नियमितपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती.
सततच्या पाठपुराव्यामुळे आज अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय अमलात आला असून परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

शिवजयंतीनिमित्त ‘सावरकर वाचनालयाचा’ प्रेरणादायी उपक्रम

Next Post

त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई

त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

March 19, 2026
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

March 19, 2026
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

March 19, 2026
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

March 19, 2026
कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम, २५ दिवसानंतरही प्रशासनाचे  आंदोलनाकडे दुर्लक्ष

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

March 18, 2026
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

March 18, 2026
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

March 18, 2026
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

March 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक