मुदत संपलेल्या सरपंचांची सहा महिन्यासाठी प्रशासकपदी नेमणूक
सोलापूर… राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुदतीत होणार नसल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने मुदत संपलेल्या सरपंचांची सहा महिन्यासाठी प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी घेतला आहे . तसेच गावच्या विकासासाठी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक करण्याचे आदेशही देण्यात आली आहे .त्यामुळे मुदत संपलेल्या सरपंचांना विकास कामे करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने त्यांना सहा महिन्यांची लॉटरी लागली आहे .
राज्य सरपंच परिषदेने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. यासाठी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अॅड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदीनाथ देशमुख व माजी जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी पाठपुरावा केले होते. त्याची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी राज्यातील मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सहा महिने निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाली आहे. शिवाय या सहा महिन्याच्या काळात विकास कामे प्रलंबित राहू नये म्हणून सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . या निर्णयामुळे मुदत संपलेल्या सरपंचांना कारभारी म्हणून सहा महिन्यांचे अधिक कालावधीची लॉटरी लागली आहे.
….
विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत
…
राज्य सरपंच परीषदेने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मुदतवाढ संपलेल्या सरपंचांना प्रशासक म्हणून नेमणूक होण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्णयामुळे सरपंच यांना प्रशासक म्हणून सहा महिन्यांची मुदत मिळाली आहे. यामुळे गावातील विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत.
शिवानंद बंडे, नांदणी सरपंच तथा तालुका समन्वयक, राज्य सरपंच परिषद
__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









