शेत रस्ता अडविणार्यावर होणार कारवाई
मुंबई…
शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण किंवा रस्त्याचे करणाऱ्या नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे.‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजने’च्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला. महसूल विभागाने याबाबतचा आदेश जारी केला.
त्यामुळे यापुढच्या काळात गाव नकाशावर असलेल्या किंवा शासकीय जागेतील रस्त्यांवन अतिक्रमण असल्यास तहसीलदार संबंधितांना ७दिवसांची नोटीस देतील. या मुदतीत अतिक्रमण -काढल्यास शासन स्तरावरून ते हटवले जाईल. विशेषतः ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहित जा करण्याचा हक्क मिळाला आहे अशा रस्त्यांवन किंवा मामलेदार अधिनियमान्वये शेतकऱ्यांना ये-कोणालाही पीक लागवड करता येणार नाही. जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील, त्यांना नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र करून द्यावे लागेल. अशा नोंदणीसाठी आवश्यक असणारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








