Tuesday, June 30, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उमेदवारांची होणार ‘कटकट’ दूर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 15, 2026
in सोलापूर
0
उमेदवारांची होणार ‘कटकट’ दूर

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

0
SHARES
365
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुबार मतदारांकडून घेतले हमीपत्र
सोलापूर…
जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ एका ‘सूचक’ आवश्यकता असणार आहे. त्यामुळे उमेदवारांची सूचक शोधण्याची कटकट कमी होणार आहे. शिवाय पक्ष व अपक्ष या दोघांसाठीही एकच सूचक निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाच्या उमेदवाराला पाच सूचकांची आवश्यकता होती. मात्र त्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सूचक शोधाशोध होणार नाही. दक्षिणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १६ जानेवारीपासून ७ फेब्रुवारी पर्यंत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.
दक्षिण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून दक्षिणमधील २४७ मतदान केंद्रांमधून २ लाख ६७ हजार २३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक लाख १५ हजार २२८ पुरूष, एक लाख ८ हजार १२३ महिला तर १६ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ४ हजार ३७८ दुबार मतदार आहेत. त्यांच्याकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र घेण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर हमीपत्र पोहोच करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणची सही खात्री झाल्यानंतर मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत असून २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे . २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान अर्ज माघार घेण्याचा कालावधी आहे. मात्र यावेळी २५ जानेवारी रोजी रविवार आणि २६ जानेवारी प्रजासत्ताकदिन असल्यामुळे अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाणार आहे . ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना तीन टप्यात प्रशिक्षण देण्यात रेणार आहे. तसेच उमेदवारांना सर्व प्रकारचे परवाना देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आदर्श मतदान केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आचारसंहितेवर लक्ष ठेवण्यासाठी १८ स्थिर सर्वेक्षण पथक १८ ,फिरते सर्वेक्षण पथक १२ ,व्हिडिओ सर्वेक्षण पथक ०४ विशेष व्हिडिओ पथक ०२ असणार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी ‘एस.आर.पी. कॅम्प’ (SRP Camp) येथे मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

‘इथे’ झाला जिजाऊ व सावित्रीच्या लेकींचा ‘ सन्मान ‘

Next Post

पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक