भाजपचे उमेदवार मळसिध्द मुगळे यांच्याकडून अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली
निवडणूक होईपर्यंत प्रचार शुभारंभ न करण्याचा निर्धार
मंद्रूप..
मंद्रूप पंचायत समिती गणात भाजप उमेदवार मळसिध्द मुगळे व राष्र्टवादीचे अप्पाराव कोरे यांच्यामध्ये ‘काटे कि टक्कर’ लढत होत आहे. त्यामुळे मुगळे भाजपाकडून शुभारंभ करून प्रचारास सुरूवात करणार होते. बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मंद्रूप येथील मळसिध्द मंदिरात मंद्रूप पंचायत समिती गणाचे उमेदवार मळसिध्द मुगळे हे सहकाऱ्यांसमवेत नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार होते . त्यासाठी हलगीचा कडकडाट अन् कार्यकर्त्यांकडून जयघोषही सुरू होता. नऊ वाजल्यापासून वातावरणनिर्मिती आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू होती. साडेनऊ वाजता पदयात्रा काढून दहा वाजता मंदिरात पोहोचले. यावेळी मंदिरात प्रवेश करून प्रचार शुभारंभ नारळ फोडताच मुगळे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्र्टवादीचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचा विमान दुर्घटनात निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुगळे यांनी क्षणाचाही विचार न करता राजकीय मतभेद बाजूला ठेऊन प्रचार शुभारंभ रद्द केला. मळसिद्ध मंदिरातच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उमेदवार मुगळे यांनी अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते , कार्यकर्त्यांची कदर असणारा तसेच वेळेला महत्त्व देणारा नेतृत्व होते. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्याविषयी आधारच आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे . ते राज्याचे प्रभावशील व विकास प्रिय नेतृत्व होते . त्यामुळे निवडणूकीतील प्रचारापेक्षाही राज्याची झालेली हानी महत्त्वाची आहे. स्थानिक राजकारणात राष्र्टवादी विरोधी पक्ष असला तरी राज्यात महायुती सरकार आहे. शिवाय अजितदादा पवार हे आदर्श नेतृत्व होते. म्हणून
निवडणुका होईपर्यंत प्रचार शुभारंभ न करता घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याविषयी साद घालणार असल्याचे मुगळे यांनी सांगितले.









