मरीआईवाले समाजाचा न्यायासाठी पोलीस स्टेशन समोर उपोषण

मंद्रूप…
दीड महिन्यापूर्वी मंद्रूपमधील
लक्ष्मण मरीआईवले यांच्या मुलीचे अपहरण झाले. मंद्रूप पोलीसात अपहरण केलेल्या व्यक्तीविरोधात तक्रार करूनही अद्याप मुलीचा शोध लागला नाही . मंद्रूप पोलीस राजकीय दबावामुळे अपहरण केलेल्या व्यक्तीविरोधात कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबावर अन्याय होत असल्यामुळे मरीआईवाले समाज न्याय मागणीसाठी ऊन्हामध्येच मंद्रूप पोलीस ठाणेच्या प्रवेशव्दारासमोर उपोषणास बसला आहे.
मंद्रूपमधील इंदिरानगर येथे राहणार्या लक्ष्मण मरीआईवाले यांच्या मुलीचे शौचालयास गेल्यानंतर अपहरण करण्यात आले. अपहरण करणार्या व्यक्तीविरोधात तक्रार करूनही मंद्रूप पोलीस संबंधित व्यक्तिविरूध्द कारवाई न करता टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे तपास करणार्या अधिकारीविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आले. त्यानंतर ६ मे रोजी मषद्रूप पोलीस ठाणेसमोर उपोषणास बसल्यानंतर पोलीस अधिकारी यांनी तपास करून आठ दिवसात मुलीचा शोध घेण्याची ग्वाही दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र तीन आठवड्यानंतरही पोलीस निरीक्षकांकडून न्याय न मिळाल्याने मरीआईवाले समाजांनी मंद्रूप पोलीस ठाणेच्या प्रवेशव्दारासमोर उपोषण सुरू केला आहे. त्यामुळे मंद्रुप पोलीसांची धावपळ सुरू झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व गोपनीय शाखेचे पोलीस सागर चव्हाण यांनी उपोषण करणार्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. मात्र मुलीचे अपहरण करणार्यांविरोधात कारवाई व मुलगी ताब्यात मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे मरीआईवाले समाजाच्या महिलांनी सांगितले.

….
भटका समाज न्यायापासून वंचितच
…
मरीआईवाले समाज भटका असून दररोज उदरनिर्वाहासाठी भटकंती करतो. विकासाच्या योजनापासून वंचित असणार्या मरीआईवाले समाजाला न्यायासाठी दररोज मंद्रूप पोलीस ठाणेला चकरा मारावे लागत आहे. त्यामुळे भटक्या समाजाला न्याय कधी मिळणार ? असा सवाल मशप्पा मरीआईवाले यांनी उपस्थित केला आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









