विकासकामांमुळे निवडून देण्याचा निर्धार
सोलापूर … महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून, प्रभाग २५ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव हत्तुरे यांना मतदारांचा मिळणारा पाठिंबा लक्षणीय ठरत आहे. विशेषतः या भागातील युवा पिढी आणि महिला वर्गाने हत्तुरे यांना विकासकामांमुळे निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
प्रभाग २५ मधील सुशिक्षित आणि कष्टकरी युवा पिढीने यंदा परिवर्तनाची लाट आणण्याचे ठरवले आहे. वैभव हत्तुरे यांच्या जनसंपर्काची पद्धत आणि युवकांच्या प्रश्नांची असलेली जाण यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. “आमच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी वैभव हत्तुरे यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे,” अशा भावना येथील स्थानिक तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
वैभव हत्तुरे यांना केवळ युवा पिढीच नव्हे, तर महिला वर्गाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. प्रभागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि सुरक्षा या प्रश्नांवर हत्तुरे यांनी दिलेले ठोस आश्वासन महिलांना भावले आहे. “वैभव हत्तुरे हे आमच्या सुख-दु:खात धावून येणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांना यावेळेस मोठ्या मताधिक्याने विजयी करणारच,” असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या माध्यमातून शहराचा आणि प्रभागाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, हत्तुरे यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र दिसत आहे.









