कै. महादेव म्हेत्रे मैदानावर शेतकर्यांची गर्दी
सोलापूर…
शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे काळाची गरज आहे. वाढत्या महागाईमुळे शेती नुकसानकारक ठरत आहे, म्हणून कृषी प्रदर्शनातील आधुनिक यंत्रांचा वापर होण्यासाठी जनजागृती गरजेछे असल्याचे प्रतिपादन महाराष्र्ट राज्य सहकार परिषद अध्यक्ष राजन पाटील यांनी केले. मंद्रूप येथील स्व. महादेव म्हेत्रे मैदानावरील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख,कृषी प्रदर्शनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख, पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तमण्णा पुजारी, मळसिध्द पुजारी, बाळासाहेब देशमुख , सुरेश पाटील, सुरेश टेळे, चंद्रकांत देशमुख , बिळेणी सुंटे, मंडल कृषी अधिकारी किरण सावंत, कृषी सहायक रमेश फरताडे, आर.डी. गोसावी, सुनील व्हनमाने, अनिकेत देशमुख, अविनाश देशमुख , सुरेश देशमुख , बाबुशा देशमुख, महेश रगटे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी मळसिध्द देवस्थान कमिटी आयोजित कृषी प्रदर्शनाचे कौतुक करून सहकार्याची ग्वाही दिली.
मंद्रूप येथे १३ ते १५ जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनामध्ये ७० स्टॉल असून शेतीमधील अत्याधुनिक औजारासह विविध साहीत्यांचे स्टाॅल्स आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक शेती पद्धतीचा वापर करण्यासाठी मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केला आहे.









