शिक्षकांच्या ‘टॅलेंट’विषयी शंका
सोलापूर..
सर्वोच्च न्यायालयाने
जिल्हा परिषद व माध्यमिक विभागात शिक्षक होण्यासाठी व नोकरी टिकवून ठेवण्यासाठी टिईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षकांसाठी टिईटी परीक्षा उत्तीर्ण सक्तीचे करण्यात आल्याने शिक्षकांमधून या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाले नाही. म्हणून तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या टिईटी परीक्षेचा निकाल लागला असून केवळ ‘ ३ ‘ टक्के शिक्षकच या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर परीणाम होणार आहे. सामाजिक शास्त्र १ व २ परीक्षेत ३ टक्के तर गणित व विज्ञान २ परीक्षेत २८ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे टिईटी परीक्षा शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सोलापूर जिल्ह्यातून जवळपास १२ हजार उमेदवारांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी १०,७८९ पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली. एनआसीच्या पोर्टल वरील अंदाजीत माहिती प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील २३८ उमेदवार पास झाले आहेत. तर सेवेतील कर्मचारी उत्तीर्ण संख्या जवळपास ५८ पेक्षा जास्त आहे.
तीन महिन्यांपूर्वी राज्य परीक्षा परीषदेकडून टिईटी परीक्षा घेण्यात आली . सर्वोच्च न्यायालयाकडून सक्तीच्या करण्यात आलेल्या टिईटी परीक्षेसाठी राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आंदोलने केली . यावेळी शाळा बंद ठेवण्यात आले. पाच वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ची मुदत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, असा अभिप्राय विधि व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक शिक्षकांनी नोकरी टिकविण्यासाठी टिईटी परीक्षा दिली . मात्र या परीक्षेचा निकाल आश्चर्यकारक लागल्याने शिक्षकांना पुन्हा टिईटी परीक्षा वारी करावी लागणार आहे.
…
परीक्षा टिईटी
…..
इयत्ता १ ली ते ५ वी पाहिला पेपर
परीक्षेस बसले -१,५२६०५
उत्तीर्ण -४,७०९
टक्केवारी -३.०८%
इयत्ता ६ वी ते ८वी- दुसरा पेपर (- गणित विज्ञान)
परीक्षेला बसले- ७५,५९९
उत्तीर्ण झाले -२१,४१४
टक्केवारी- २८.३३%
इयत्ता ६ वी ते ८ वी (सामाजिकशास्त्र)
परीक्षेला बसले -१,२५,७४८
उत्तीर्ण -४,०४५
टक्केवारी – ३.२२%
एकूण -३,५३,९५२
पात्र _३०,१६८
टक्केवारी ९%
…
पेपर १ (इ. १ ली ते ५ वी) प्रविष्ट उमेदवार ..1,52,605 , उत्तीर्ण .. 4,709, निकाल 3.08% टक्के
पेपर २ -गणित/विज्ञान (इ. ६ वी ते ८ वी) प्रविष्ट उमेदवार ..
75,599 , उत्तीर्ण..21,414, निकाल.. 28.33% टक्के
पेपर २ -सामाजिकशास्त्र (इ. ६ वी ते ८ वी), प्रविष्ट उमेदवार..
1,25,748 उत्तीर्ण..4,045, निकाल.. 3.22% टक्के
……,
एकूण .. प्रविष्ट उमेदवार..
3,53,952 , उत्तीर्ण..30,168,
निकाल..,8.53% टक्के
…
थोडक्यात विश्लेषण..
…
सर्वाधिक निकाल पेपर २ (गणित विज्ञान) – 28.33 टक्के,
सर्वात कमी निकाल पेपर १ व पेपर २ (सामाजिकशास्त्र) – सुमारे 3 टक्के
एकत्रित निकाल (सर्व पेपर मिळून) – 8.53 टक्के
……









