दक्षिणमध्ये दोन दिवसात १२ उमेदवारांची माघार
सोलापूर,…
श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक सुरेश हसापूरे यांनी भाजपाकडून हत्तूर गणासाठी उमेदवारीची मागणी करून अर्ज भरला होता. मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी माने व कल्याणशेटी गटातील उमेदवारी रद्द करून देशमुख गटाच्या इच्छुकांना उमेदवारी दिली. त्यामुळे हसापूरे यांचा अर्ज अपक्ष म्हणून राहीला होता. मात्र शनिवारी हसापूरे यांनी
पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करून
अर्ज माघार घेतल्याने निवडणूकीतील ‘व्टीस्ट’ संपला आहे.
दक्षिण सोलापूरातील ६ जिल्हा परिषद ७३ व १२ पंचायत समिती जागांसाठी १४५ उमेवारांनी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी २३ जानेवारीला पहिल्या दिवशी सहा जणांनी तर २४ जानेवारीला दुसर्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतला. हत्तूर गणासाठी उमेदवारी दाखल केलेले सुरेश हसापूरे यांनी शनिवारी उमेदवारी माघार घेतल्याने दक्षिणच्या राजकारणातील व्टीस्ट संपला आहे. दोन दिवसात अनेक अपक्षांनी अर्ज माघार घेतल्याने हळूहळू निवडणूकीमध्ये रंगत येत आहे.
या निवडणूकीत आमदार सुभाष देशमुख , आमदार सचिन कल्याणशेटी व माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवार निवडीसाठी ताकद लावल्याने गटबाजी दिसून आली. २२ जानेवारीला अर्जांची छाननी करताना भाजपाच्या उमेदवारांनी भाजपाच्याच उमेदवाराविरोधात हरकत घेतल्याने देशमुख व माने गट आमनेसामने आल्याचे दिसून आले.
दोन दिवसात बोरामणी गटातील
यशवंत खंडागळे अपक्ष, कासेगाव गण चंद्रकांत जाधव अपक्ष,शंकर वाडकर शिवसेना , रामहरी चौगुले अपक्ष, बोरामणी गण – निर्मला राठोड अपक्ष, वळसंग गण _भगवान गोतसुर्वे अपक्ष ,
बिपिन करजोळे अपक्ष, होटगी गण लक्ष्मी गायकवाड अपक्ष, शिलवंती लांडगे अपक्ष यांनी उमेदवारी माघार घेतली .