२७ जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी शेवटची संधी
सोलापूर… २५ जानेवारी रोजी रविवार व सोमवारी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्याने शासकीय कामकाजाला सुट्टी आहे. त्यामुळे या दोन दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज माघार घेता येणार नाही. त्यामुळे मंगळवार २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे दोन दिवस अर्ज माघार घेता येणार नसल्याची माहीती दक्षिण सोलापूरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी दिली.
१६ जानेवारीपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. २१ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी होता. तर २२ जानेवारीला अर्जांची छाननी होऊन २३ व २४ जानेवारीला अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. मात्र २५ जानेवारी रोजी रविवार व २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने निवडणूक कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया बंद असणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतर निवडणूकीत रंगत येणार आहे.












