भाजपाच्या सविता उंबरजे यांनी मतदारांशी साधला संवाद
भंडारकवठे…
दक्षिण सोलापूरचे विकासप्रिय नेतृत्व आमदार सुभाष देशमुख व श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या माध्यमातून भीमा नदीकाठावरील गावाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असून मतदारांनी निवडून देऊन विकासाची संधी द्यावी. जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडविण्याचे आवाहन भंडारकवठे जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या उमेदवार सुजाता उंबरजे यांनी केल्या. वडापूर, अंत्रोळी, कूसूर, खानापूर व तेलगाव गावांच्या मतदारांशी संवाद साधताना बोलत होत्या.
यावेळी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस व कुसुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील नांगरे, माजी सरपंच परशुराम कोळी, कृष्णप्पा बिराजदार, राम सावळे, सिद्धाराम स्वामी , अनिल नांगरे, माजी सरपंच संतोष माशाळे , रायप्पा आकळवाडे , गजानन मेडेदार , सिध्दाराम विंचुरे, अणप्पा बिराजदार, विठ्ठल बिराजदार, सत्तर शेख ,अनिल स्वामी, आप्पासाहेब बिरुणगी, शिवानंद कोळी, सोहम अळ्ळिगीडा यांच्यासह मतदार उपस्थित होते.
यावेळी सुनिल नांगरे म्हणाले कि, भाजपाने लाडकी बहिण योजना सुरू करून महिलांना स्वावलंबी बनविला आहे. तसेच विविध अनुदानाच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक सहाय केल्यामुळे शेती व्यवसायाला चालना मिळाली आहे. म्हणून दक्षिणमधील प्रलंबित विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सुनिल नांगरे यांनी केला. 












